






१९७७ च्या निवडणुकीपूर्वी लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी तत्कालीक प्रश्न घेऊन उठाव केला. तो त्यावेळी यशस्वी झाला. परंतु त्यानंतर तसा ध्येयवाद व समाजमनाची पकड घेणारे सामाजिक नेतृत्व आज दिसत नाही. पर्यायाने या देशातील सामाजिक चळवळ संपुष्टात आली आहे. समाज मनात नैराश्येचे मळभ आहे. विचाराला दरिद्रता आहे आणि चंगळवादाला महत्व आहे. परिणामी समाज आणि समाजमन सामाजिक चळवळीच्या दृष्टीने वांझोटे होत चालले आहे. ही मानसिकता बदलली नाही, तर समाजात लाज असणारे सर्व दोष राजमान्य शिष्टाचाराच्या पंगतीत आजच बसले आहेत आणि उद्याही ते तसेच राहतील, म्हणून सावधानतेचा इशारा देण्यासाठी हे समाजपुरुषा, चळवळ मरु देऊ नको. चळवळीला बळ द्या आणि चळवळ शांत झाली तर तो समाज मृतवत होतो. शांत होतो. आणि अशी शांती लोकशाहीच्या लोकतंत्राला चिरशांती देईल. तसे होऊ नये म्हणून स्वातंत्र्यापूर्व ध्येयवाद, जाहीरनाम्यांची अंमलबजावणी करणारे सरकार व राजकीय पक्ष उदंड होवोत आणि समाजात सामाजिक चळवळीचे भान वर्धिष्णू होवो, या अपेक्षेने या देशाच्या संविधानाला प्रसिध्द होणाºया या मासिकाला शुभेच्छा देतो.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.